नुकताच मी एका परिसंवादात भाग घेतला. परिसंवादात खूप अनुभवी, खूप विद्वान आणि खूप यशस्वी व्यक्तींनी भाग घेतला होता. प्रत्येकाची कहाणी, त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांना मिळालेलं यश हे ऐकणं, आयुष्याच्या विविध कंगोऱ्यांवर त्यांच्याशी चर्चा करणं व्यक्तीगतरित्या खूप प्रेरणादायी ठरलं. त्या सगळ्या चर्चेत माझ्या सहवासात आलेल्याच काय पण जगात कुठेही यशस्वी झालेल्या व्यक्तीच्याबाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली

माझे संवादिनीचे गुरू पं. मनोहर चिमोटे यांची काल 5 वी पुण्यतिथी. त्यांचं सही सही वर्णन म्हणता येईल असं सूर संगम चित्रपटातील गाणं मला आठवतंय. ते गाणं असं ; साधो ऐसा ही गुरू भावे l राग रंग के भर भर प्याले पीये और पिलावे l साधो ऐसा ही गुरू भावेl नाद छुपा तन मे लय मनमे

परवा गणेशोत्सवात एक ५-६ वर्षाचा छोटा मित्र माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला “काका, तुम्हाला एक कोडं घालू का?”. मी हो म्हटल्यावर त्यानी विचारलं ” काका ATM चा फुलफॉर्म सांगा.” मी म्हटलं, “अगदीच सोपं आहे. (A)ऑल (T)टाइम (M)मनी”. माझं उत्तर त्याच्या अपेक्षेप्रमाणे चुकल्याचा आनंद त्याच्या चेहेऱ्यावर झळकला आणि तो म्हणाला , ” नाहीच मुळी. खरं उत्तर

Ashtang Yog

परवा एका कार्यक्रमानंतर घरी परतलो आणि अंगावरचा कुर्ता काढता काढता सहज मनात आलं की हा कुर्ता पुन्हा धुवून, इस्त्री करून नीट ठेवला पाहिजे म्हणजे पुढे नंतर पुन्हा कधीतरी वापरता येईल. गम्मत म्हणजे हा विचार करता करता भंगवंतांच्या भगवदगीतेच्या सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायामधला २२ वा श्लोक सहज आठवला; वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि। तथा

आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्यावर खूप परिणाम होतो असा मानसशास्त्राचा एक सिद्धांत आहे. सर्व संत मंडळींनी म्हणूनच सत्संगतीचा महिमा गायला आहे. वातावरणाचा मनावर खूप परिणाम होतो आणि त्याच वातावरणातील लहरींशी मन एकरूप होण्याचा प्रयत्न करतं असं मानसशास्त्र मानतं. आधुनिक जगात सर्वच बाबतीत संगणकीकरण सुरु आहे. डिजिटल जग सर्वच व्यापून दशांगुळं उरलं आहे. ध्वनी डिजिटल, छायाचित्र डिजिटल,

बुद्धिबळ हा खूप गमतीशीर खेळ आहे. हालचालीला केवळ ६४ घरं. वेगवेगळ्या स्वभावाची म्हणजेच चालीची ३२ प्यादी. त्यात एक वजीर आणि एक राजा. ६४ घरं पण दोनच रंगांची. घर एक तर काळं तरी नाहीतर पांढरं तरी. बुद्धिबळ खेळताना पहिल्या चालीपासून सावध असायला लागत कारण एक चाल, एक निर्णय चुकीचा घेतला आणि समोरचा चाणाक्ष असला की जी

आमच्या घराजवळच एक शांत मंदिर आहे. “जागृत स्थान” अशी प्रसिद्धी झाली नसावी कदाचित म्हणून ते मंदिर अजून तरी गजबजलेलं नाही आणि म्हणूनच देव अजूनही त्या वास्तूत टिकून आहे अशी एक माझी श्रद्धा आहे. त्या शांत मंदिरात गेलं नं की गाभाऱ्यात गेल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. परिसरातल्या गडबड हालचाली आवाज बाहेरच रावखुळलेले असतात. गाभाऱ्यात बऱ्याच वेळा

कोणी जर कधी आपल्याला सांगितलं की कुणी आपल्याबरोबर २४ तास राहतं. त्याच्या इच्छेनुसार आपल्याला नाचवतं पण असं असूनही आपली त्याच्याशी फारशी ओळख नसते तर खरं वाटेल? अहंकाराचं तसंच नाही का? खूप ऐकत आलोय या अहंकाराबद्दल. प्रत्येक जागृत क्षणी आपला अहंकार एक तर सुखावत असतो किंवा दुखावत असतो. पण हा अहंकार म्हणजे नक्की आहे तरी काय?

१६.१ दोन मित्रांची खूप गट्टी होती. ते नेहेमीच त्यांचं सगळं एकमेकात वाटायचे. त्या दिवशी दंगल झाली आणि त्यांच्याच समाजाने त्यांना मारून टाकलं. कारण मारेकऱ्यांनी फक्त कपडे पाहिले आणि त्यांचे रंग. त्यांना कुठून माहीत असणार त्या दोघींनी आदल्याच रात्री त्यांच्या आवडत्या ड्रेसची अदलाबदल केली होती एकदाच घालून पाहण्यासाठी. १६.२ त्याचा भोंगा सुरू झाला की याच्या तेवढ्याच

जन्माला येऊन थोडं कळायला लागल्यावर प्रत्येक श्वास हा आपण जगापासून वेगळे आहोत ही जाणीव करून घेणे आणि मग जगात आपलं वेगळेपण प्रस्थापित करण्यात खर्च होतं. आपण जगावेगळ काहीतरी कराव, आपण चार चौघात उठून दिसावं, आपलं चार चौघात कौतुक व्हावं यासाठी आपल्या अजाणतेपणी आपले आईवडील आणि नंतर जाणते झाल्यावर आपण या इच्छेला खात पाणी देतो आणि

TOP