नुकतीच एक गमतीशीर बातमी वाचली. अमेरिकेमध्ये दर वर्षी एक कोटी पन्नास लाख (१,५०,००,०००) इतक्या दातांच्या रूट कॅनालच्या केसेस होतात. प्रत्येक रूट कॅनाल चा सरासरी खर्च ८०० डॉलर्स इतका असतो. म्हणजे दरवर्षी अमेरिकेमध्ये १२ अब्ज डॉलर्स (१२,००,००,००,०००) इतका खर्च केवळ दातांच्या रूट कॅनाल वर होतो. या सरासरी अंदाजित संख्या जरी धरल्या तरी १० अब्ज डॉलर तरी

प्रसंग एक: आद्य शंकराचार्य म्हणजे ज्ञानभांडार, विद्वत्तेचा सागर, बुद्धीचा भास्कर. ते एकदा समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले होते. तिथे गेल्यावर त्यांनी आपला दंड वाळूत खुपसला आणि वर काढला. त्याला काही वाळूचे कण चिकटले होते. त्याच्याकडे निर्देश करून ते आपल्या शिष्यांना म्हणाले की, “या समुद्रकिनाऱ्यावर जितकी वाळू दिसते आहे त्यापेक्षा अनंत पटीने विश्वात ज्ञान पसरलं आहे. आणि त्यापुढे

लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीत एका राजाला डुकराचे कान होते. त्यामुळे तो असा फेटा बांधायचा की कुणालाच त्याचे कान दिसायचे नाहीत. पण त्या राजाचे केस कापणारा ‘राजनाभिक’, त्या पासून कसं लपून राहणार हे गुपित! पण राजाने त्याला सक्त ताकीद दिली होती की त्याने जर हे गुपित कोणाला सांगितलं तर त्याचा त्याच दिवशी शिरच्छेद

साक्षी हे गण आप्त मित्र मिळुनी जमली इथे मंडळी। येऊनी घटिका समीप शुभ या स्थानावरी थांबली। वरमाला धरुनी करी सुखकरी लक्ष्मी उभी मंदिरी विष्णूचे व्रत घेऊनि वर उभा वरण्या वधू लाजरी।।1।। सौख्याने भरू देत हा प्रतिदिनी संसार ऐसा खरा। आतिथ्या करण्यास मात्र कधिही देईन ना अंतरा। ऐशा या वाचनास नित्य दृढ या ठेऊनिया अंतरी। विष्णूचे

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एका समारंभात गेलो होतो. त्या समारंभात एक जोडपं आणि त्यांचा एक चुणचुणीत मुलगा असं कुटुंब भेटलं. विषयात विषय निघत गेले आणि तो मुलगा काय करतो यावर विषय सुरू झाला. एकंदरीत वर्णनातून असं कळलं की तो मुलगा इंटरनॅशनल शाळेत शिकतो. शाळेमध्ये फुटबॉलचं विशेष कोचिंग आठवड्यातून दोन वेळा सकाळी सहा वाजता शाळा सुरु

काही दिवसांपूर्वी मी लेख लिहू लागलो. मी काही लेखक नव्हे. पण मनात विचारांचे जेव्हा जेव्हा तरंग उठतील ते तरंग माझ्या कुवतीप्रमाणे शब्दबद्ध करायचे या विचाराने मी लिहायला लागलो. मी सुचेल तसं आणि सुचेल तेव्हा लिहीत असे, अजूनही तसंच लिहितो. दररोज काहीना काही विषयासंबंधातील चिंतन होतं आणि ते विचार मनात घोळत असल्यामुळे त्या अनुषंगाने दररोज काही ना काही

माझ्या ओळखीचं एक दाम्पत्य आहे. त्यातील श्रीमान रात्री झोपल्यावर खूप घोरत असत. इतकं की त्या घोरण्यामुळे श्रीमतींना झोपणं मुश्किल होऊन जात असे. बरेच दिवस त्या दांपत्याने या समस्येवरचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. घोरण्यावरची औषध झाली, नाकाला लावायची क्लिप झाली, कुशीवर निजण्याची सवय लावायचा प्रयत्न झाला पण सर्व उपाय थकले. एक दिवस अचानक गर्मीच्या दिवसांमध्ये एका

श्री रामकृष्ण परमहंसांच्या एका भक्ताची एक गोष्ट वाचनात आली. ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे आणि ज्यांची श्रद्धा आहे अशी मंडळी त्यांच्या गाडीत त्यांच्या आराध्य देवतेचा किंवा सद्गुरूंचा फोटो ठेवतात. साधारणतः तो फोटो गाडीत बसलेल्या माणसांच्याकडे तोंड करून ठेवलेला असतो. पण या श्री रामकृष्णांच्या भक्ताने त्या फोटोचं ​छोटं ​मंदिर आणि त्यातील श्रीरामकृष्णांचा फोटो समोरच्या बाजूला ड्रायव्हर सारखा

काही दिवसांपूर्वी एक अप्रतिम विडिओ पाहिला. तो होता पदार्थविज्ञानात आणि एकंदरीतच जगाच्या इतिहासात उलथापालथ घडवून आणणाऱ्या आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाच्या दोन सिद्धांतांविषयी. एका सिद्धांतात आईन्स्टाईनने जडपदार्थ (Matter), ऊर्जा (Energy) आणि प्रकाशाचा वेग (Speed of Light) याचा संबंध जोडला आणि एक जगप्रसिद्ध समीकरण जन्माला घातलं E=MC². या समीकरणाचा अर्थ असा की एखाद्या पदार्थात किती ऊर्जा साठवलेली असते?

आमच्या सोसायटीत दर वर्षी दोन वेळा पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचा कार्यक्रम असतो. साधारण ज्या दिवशी टाकी स्वच्छ होणार असते त्या दिवसापूर्वी दोन दिवस आमचा वॉचमन सोसायटीमधल्या सगळ्या घरात येऊन “कल टाकी साफ होनेवाला है. पुरा दिन पानी बंद रहेगा. घरमे पानी भरके रखना. परसो भी सफाईके कारण थोडा गंदा पानी आ सकता है. थोडा ध्यान

खांब खांब खांबोळी ​एकदा ट्रेन मधून दूरच्या प्रवासाला जात होतो. कामानिमित्त दौरा असल्यामुळे एकटाच होतो. माझ्या डब्यात माझ्या कंपार्टमेंट मध्ये माझ्यासारखेच कामानिमित्त प्रवास करणारे इतर पाच प्रवासी होते. काही नोकरी करणारे काही व्यावसायिक होते. पल्ला बराच लांबचा होता. हळू हळू परिचय व्हायला लागला, गप्पा व्हायला लागल्या. ​मला अशी संभाषणं खूप आवडतात. नवीन छान माणसं भेटतात,

माझ्या करियरच्या सुरुवातीच्या काळात जवळजवळ १४ वर्ष माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर नोकरी करण्याचा योग आला. आणि त्या नंतर नोकरी सोडून व्यवसाय सुरु करण्याचा , बऱ्याच जणांच्या दृष्टीने मूर्खपणाचा!, निर्णय घेतला. तो निर्णय इतरांना मूर्खपणाचा वाटणं साहजिकच होतं त्यांची चूक नाही त्यात. कारण त्या काळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं स्थान स्वर्गाच्या दोनच बोटं खाली आहे असं

TOP